मधुमक्षिका पालन योजना : मधुमक्षिका पालन करण्यासाठी मिळणार अनुदान

Madhumakshika Palan Yojana : मंडळी शेतीसोबत पूरक व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढू शकते. अशाच एका फायद्याच्या व्यवसायासाठी जिल्हा परिषद सातारा सेस निधी 2024-25 अंतर्गत मधुमक्षिका पालन प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना अनुदानाच्या आधारे मधपेट्या उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे मधाचे उत्पादन मिळण्यासोबतच पिकांचे परागीभवन होऊन उत्पादनक्षमता वाढणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने सातबारा उताऱ्यात करा नोंदणी , जाणून घ्या सविस्तर माहिती

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे आणि त्याच्या नावावर 8/अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतात फळझाडे, फुलझाडे, डाळी किंवा धान्य पिके असतील तर मधमाशी पालन सोपे होते. याशिवाय परिसरात जंगली झाडे असल्यास मधमाशांसाठी उपयुक्त वातावरण तयार होते.

अर्ज आणि निवड प्रक्रिया

शेतकऱ्यांचे अर्ज पंचायत समितीमार्फत स्वीकारले जातील. गट विकास अधिकारी अर्ज तपासून जिल्हा परिषद समितीकडे प्रस्ताव सादर करतील. समितीची मान्यता मिळाल्यानंतरच निवड केली जाईल. जर अर्जांची संख्या जास्त झाली तर पंचायत समिती स्तरावर लॉटरी काढून जेष्ठतेनुसार यादी तयार केली जाईल.

या विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपये , असा करा ऑनलाईन अर्ज

अनुदान आणि सुविधा

निवड झालेल्या लाभार्थ्यांना पाच मधपेट्या आवश्यक साहित्य व वसाहतीसह मिळतील. मात्र, अनुदान मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांनी मध संचालनालय, महाबळेश्वर येथे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

मधपेट्यांचे प्रकार आणि किंमती

या योजनेत विविध प्रकारच्या मधपेट्या उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, मेलीफेरा वसाहतीसह जंगली पेटी, सातेरी वसाहतीसह जंगली पेटी किंवा सागवानी पेटी तसेच रिकाम्या पेट्यांचे प्रकार. प्रत्येक प्रकाराची किंमत वेगळी आहे आणि त्यावर जिल्हा परिषद व खादी ग्रामोद्योग मंडळाकडून मिळून 50 टक्के अनुदान दिले जाते. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त पाच मधपेट्यांचे युनिट घेण्याची मुभा आहे.

या नागरिकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार , असा करा अर्ज

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर का आहे मधमाशी पालन?

मधमाशी पालन हा फक्त मध उत्पादनापुरता मर्यादित व्यवसाय नाही. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळतेच पण शेतातील पिकांचे परागीभवन सुधारल्याने उत्पादनात 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ होते. पर्यावरणस्नेही पद्धतीने रोजगारनिर्मिती करणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी एक उत्तम संधी ठरतो.

अधिक माहिती कुठे मिळेल?

जिल्हा परिषद सातारा यांच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.zpsatara.gov.in या योजनेबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या अनुदानाचा लाभ घ्यावा.

Leave a Comment